वर्गात शिकवता शिकवता गुरुजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. "बरं का बाळांनो? खोटं ते खोटं. ते कधीहि उपयोगी पडणं शक्य नाही, म्हणून जे खोटं आहे, त्याला आपण कधीही थारा देता कामा नये. " याप्रमाणे बोलून त्यांनी बापूला विचारलं, "काय रे बाप्या ? माझ म्हणणं तुला पटलं ना ? "
यावर बापू म्हणाला, " गुरुजी, प्रत्यक्ष खोट्या दातांची कवळी तुमच्या तोडांत दिसत असताना, तुमचं म्हणणं मला कसं पटेल?"
यावर बापू म्हणाला, " गुरुजी, प्रत्यक्ष खोट्या दातांची कवळी तुमच्या तोडांत दिसत असताना, तुमचं म्हणणं मला कसं पटेल?"
एका डॉक्टरांनी आपल्या रोग्याला विचारल्म , " अलबतराव, मी काल दिलेल्या औषधामुळं तुमच्या उलट्या बंद झाल्या ना ?"
अलबतराव म्हणाले, " हो, उलट्या पार बंद झाल्या, पण अजून मला श्वास मात्र अधुनमधून लागतोय."
आवर डॉक्टर अगदी आत्मविश्वासाने त्यांना म्हणाले, " अलबतराव, त्याची बिलकूल काळजी करू नका तुम्ही. माझ्या आजच्या औषधाने तुमचा श्वासही कायमचा बंद होईल."
गुरुजींनी विचारलं, "बबलू! मेंदूशिवाय माणूस किती वर्षे जगू शकेल रे ? " बबलून प्रतिप्रश्न केला, " गुरुजी! सध्या तुमचं वय किती आहे?"
एक सौदागर घोड्यांच्या बाजारात विकण्यासाठी आपला एक थकलेला म्हातारा घोडा घेऊन आला. त्या घोड्याचा एकंदर `अवतार' पाहून एका माणसानं सौदागराला त्या घोड्याची किंमत विचारली. सौदागराने शंभर रुपये सांगताच तो गृहस्थ म्हणाला, "या मरतुकड्या घोड्याचे शंभर रुपये कोण देईल? तू हा गोडा मला पाच रुपयांना दे."
यावर सौदागर म्हणाला, "बरं, पाच रुपये. बोनीच्या वेळी होत असलेला हा सौदा, मी केवळ पंच्याण्णव रुपयांसाठी कशाला मोडू?"
यावर सौदागर म्हणाला, "बरं, पाच रुपये. बोनीच्या वेळी होत असलेला हा सौदा, मी केवळ पंच्याण्णव रुपयांसाठी कशाला मोडू?"
No comments:
Post a Comment